दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मी मल्हारगडावर स्वच्छता मोहिमेसाठी गेलो होतो. मी माझ्या परीने संपूर्ण गड परिसर स्वच्छ केला.
मात्र गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला दिसून आला. हा कचरा मागील एक महिन्यापासून तसाच पडून असल्याचे दिसते. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपल्या ऐतिहासिक गडांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.
जर कोणाला यासंदर्भात कोणती संस्था, स्थानिक प्रशासन किंवा पुणे महानगरपालिका / शासन यांच्याशी संपर्क साधण्याची माहिती असेल, तर कृपया याबाबत पुढाकार घ्यावा. आपले गड हे आपला अभिमान आणि वारसा आहेत. त्यांचे जतन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
चला, आपण सर्व मिळून आपले गड स्वच्छ आणि सुरक्षित ठेवूया.
जय शिवराय 🚩